Friday 10 February 2017

परदेस में निकला होगा चाँद

बालपणापासूनची माझी २५ वर्षे मध्यमुंबईत गेली. मुंबईचं जीवन अनुभवलं. आता गेली २८ एक वर्षे येथे उपनगरात राहतोय. पण सुरवातीची ५ एक वर्षे येथील जीवनाशी जुळवून घ्यायला कठीण गेली. जास्त त्रास तेव्हा होई जेव्हा होळी, गणपती, दिवाळी, नवरात्र हे सण येईत. ह्या सणांना मुंबईत केलेली धमाल आठवे. मन उदास होई, इथे एकटं, एकटं वाटे. तेव्हा वाटे 'स्वदेस में निकला होगा चाँद'.

पण एवढ्या वर्षांत आता येथे रुळलोय, रमलोय. इथल्या समाज जीवनाशी एकरूप झालोय. मुंबईच्या आठवणी येणे आता कमी झाल्यात. आता चुकून कधीतरी वाटतं, 'परदेस में निकला होगा चाँद.'

आणि मला वाटतं मनाची अशीच अवस्था सासरी रमलेल्या एखाद्या मुलीची, पोटापाण्यासाठी शहरात आयुष्य गेलेल्या स्थलांतरितांचीसुद्धा होत असावी.

2 comments:

  1. Replies
    1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

      Delete